नमस्कार,
“सर्वांना दसऱ्या निमित्त हार्दिक शुभेच्छा”
विजयादशमी म्हणजेच आश्विनशुद्धदशमीहादिवस किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो
दसरा म्हणजे सत्प्रवृत्ती नंदुष्प्रवृत्तींवर मिळवलेला विजय साजराकरण्याचासण.
अंतिम विजयहासत्प्रवृत्तींचाच होतो हा दसऱ्याचा संदेश आहे.
दसरा साजराकरण्याची पद्धत, त्यामागच्याकथा प्रदेशानुसार बदलत जातात. दक्षिण, पूर्वआणिउत्तर-पूर्वभारतात दुर्गामातेने महिषासुराचा वध केला म्हणून दसरा साजरा केला जातो.
तर,उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून दसऱ्याचा विजयोत्सव साजरा केला जातो. कथा, पद्धती, परंपरावेगळ्या असल्यातरीमूळ संदेश एकच आहे .
चांगल्याचा वाईटावर विजय.
त्यामुळेच वाईटसवयी सोडण्याचा संकल्प करण्यासाठी दसराहीच योग्यवेळ आहे.
महाराष्ट्रात दसऱ्याच्यादिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याचीपाने देतात.
परंतु आता हि पद्धत कमी होत चालली आहे कारण आता लोकांना वृक्षतोडीचे दुष्परिणामलक्षात येऊ लागले आहेत म्हणून आता लोकांनीयावर आपल्यापद्धतीने पर्याय शोधून काढले आहेत उदाहरणार्थ मिठाई देणे,चॉकलेट देणे इ .
यादिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन आणि शस्त्र पूजा करतात.सायंकाळीगावाची सीमा ओलांडून ईशान्ये सजायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटूनत्यावर अपराजिता देवीची स्थापनाकरायची आणि तिला प्रार्थनाकरायचीकी, मलाविजयीकर.
त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाणवविद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा आहे.
लहानमुलेपाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.
वरील काही गोष्टीवरून आपल्याला दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी करण्यामागे काय उद्देश असतो हे समजलं. तेव्हा या २०२० वर्षांच्या दसऱ्यापासून आपण देखील आपल्या आयुष्यात काही चांगले बदल करूया आणि चुकीच्या सवयी सोडून देऊया जेणेकरून आपलेजीवन आनंदी आणि निरोगी होईल. चला काय आहेत हे छोटे बदलत ते पाहू.
- आपण निश्चयकरूकोणाला काही व्यसन असेलते आपण सोडून देऊ.
- कुटुंबियांना समवेत एकत्रित चांगला मजेशीरवेळ घालवू.
- आपण आपला चिडचिडेपणा,आळस सोडून आनंदी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू.
- दिवसातील काहीवेळ आपणयोगा ,व्यायाम,प्राणायामया महत्वपूर्ण गोष्टीसाठी देऊ.
- आरोग्याची नियमितकाळजीघेऊ.
- एकमेकांचा द्वेष करणे सोडून देऊ आणि माणुसकी आपलेपणा जपू.
- सर्वांशी मैत्री पूर्ण संबंध प्रस्थापित करू आणि शत्रुत्व सोडून देऊ.
- प्रत्येकानी ज्याला जशी शक्य आहे तेवढी मदत करू
असे काही चांगले बदल केलेतर आपण अधिक चांगले जीवन जगू शकतो आणि सणांचा आनंद द्विगुणित करू शकतो.